Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती
पुस्तकाचे नाव--
लेखिका---अंजली कीर्तने
लेखन प्रकार-- चरित्र
प्रकाशन-- मॅजेस्टिक प्रकाशन
आनंदीबाई जोशी ह्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर.
यांच्या जीवनावर आलेल्या चित्रपटामुळे आपण आता त्यांना ओळखत असलो तरीही अंजली कीर्तने यांनी लिहिलेल्या या पुस्तकातून त्यांचे जीवनपट आपल्याला सखोलपणे समजण्यास मदत होते.
१९ वे शतक हे पुरुष प्रधान संस्कृती चे होते. त्या काळी मुलींना तेवढी मुभा नसे. भारतीय समाज, संस्कृती आणि त्याला न जुमानता एका भारतीय किंबहुना महाराष्ट्रीयन मराठमोळ्या स्त्री चे जागतिक पातळीवर जाऊन शिक्षणासाठी केलेले संघर्ष वर्णन यात अचूक टिपले आहे.
१९व्या शतकात एक वेगळे धाडस करून आनंदी बाई यांनी अमेरिकेत जाऊन शिक्षण घेतले. त्यांच्या या धाडसाचे खरे स्वप्नकार, साक्षिदार,साथीदार हे त्यांचे पती गोपाळराव गोविंदराव जोशी हे होते. त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच आनंदीबाई भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होऊ शकल्या. आनंदी बाई यांच्यावर अनेक लेख प्रसिद्ध झाले. हे पुस्तक लिहीत असताना लेखिकेने आनंदीबाई यांच्या गावास तसेच त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेतलेल्या युनिव्हर्सिटीस व तेथे राहिलेल्या थिओडोसिया कार्पेनटर व बेंजामीम कार्पेन्तर यांच्या हेलेना या मुलीची नात नॅन्सी यांच्याशी संवाद साधला. पुस्तक लिहीत असताना आलेल्या सुरुवातीच्या अडचणीचे प्रामाणिक वर्णन अंजली कीर्तने यानी केले आहे.
परदेशात जाणे आणि तेथे शिक्षण घेणे हे खूप मोठे आव्हान आनंदीबाई जोशी यांनी पेलले आणि ते सत्यात उतरवण्यासाठी अतोनात कष्ट घेतले. भारतात महिलांचे प्रश्न, दुःख त्यांच्या यातना सोडवण्यासाठी एकही महिला डॉक्टर त्या काळी नव्हती. त्यामुळे हा मोठा गंभीर पेच सोडवायलाच हवा. महिला डॉक्टर असेल तर महिलांना त्यांचे प्रश्न निःसंकोचपणे मांडता येतील. हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेऊन गोपाळराव यांनी आनंदीबाई याना शिकवले... आणि त्याचे फळ म्हणजे आनंदीबाई पहिल्या भारतीय महिला डॉक्टर झाल्या.. पण हे काही सहज घडलं नाही.अनंत अडचणींना सामोरे जावे लागले. यासाठी त्यांना अनेक वाटा शोधाव्या लागल्या... धडपड करावी लागली... या संघर्षाचे वर्णन म्हणजेच हे पुस्तक...
आनंदीबाई जोशी यांवर अंजली कीर्तने यानी एक लघुपट ही तयार केला. या लघुपटास महाराष्ट्र शासनाचा सर्वोकृष्ट लघुपट पुरस्कार मिळाला आहे.
आजच्या पिढीला कष्ट. धडपड म्हणजे नकोसे झाले आहे. पण कोणतेही यश हे कष्टाशिवाय प्रयत्ना शिवाय मिळत नसते. आज सर्व सुविधा उपलब्ध झालेल्या असूनही आपली कष्ट करण्याची तयारी नसते पण त्याकाळी मात्र आजच्या पिढीला सगळ्या सोयी उपलब्ध व्हाव्यात याच उदात्त हेतूने डॉक्टर आनंदीबाई जोशी आणि त्यांचे पती गोपाळराव जोशी यांनी आपले आयुष्य पणाला लावले. त्यांचे संपूर्ण जीवन त्यांनी खडतर प्रवासात घालवले. त्यासाठी सोसलेल्या यातना काय असतील याचे वर्णन अंजली कीर्तने यांनी केले आहे. आपण यातून नक्कीच प्रेरणा घेऊन आपले जीवन सुखकर करण्यासाठी प्रयत्न करू शकतो आणि आपल्या पुढच्या पिढीलाही यातून प्रेरणा देऊ शकतो त्यासाठी हे पुस्तक नक्की एकदा तरी वाचावे.
©® मैथिली कुलकर्णी
टिप्पण्या